HW News Marathi
देश / विदेश

मोठी बातमी! भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

हिंगोली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज(६ ऑगस्ट) ते हिंगोलीत दौऱ्यावर आहेत. तेव्हा रस्त्यात त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला आहे. राज्यपाल कोश्यारी हे नरसी नामदेवकडे जात असताना हा अपघात झाला. यात तीन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे हिंगलोत आज(६ ऑगस्ट) दौऱ्यावर आहेत. हिंगोली येथे हजेरी लावून जिल्ह्यातील सिंचनासह इतर मुद्यांचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी काही जणांची निवेदनेही स्वीकारली. त्यानंतर ते हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेवकडे रवाना झाले. नर्सी नामदेव येथे राज्यपाल कोश्यारी यांचा ताफा पोहोचताच अग्निशामक विभागाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. यामुळे हे वाहन पुढील गाड्यांवर धडकले. यात दोन गाड्यांचे नुकसान झाले. यापासून राज्यपाल कोश्यारी यांचे वाहन दूर असल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या ठिकाणी मंदिराच्या पायरीचे दर्शन घेवून राज्यपाल पुढे औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या पायरीच्या दर्शन घेऊन परभणीकडे रवाना होणार आहेत.

मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही

नांदेड दौऱ्यावर असताना राज्यपाल यांनी नवाब मालिकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं आहे.

राज्यपालांचं एक पाऊल मागे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली होती आणि कामात ढवळाढवळ करू नये याचा सल्ला देखील दिला होता. मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा मच्छिमार खात्याकडून गुजरातीची सक्ती

News Desk

मान्सून श्रीलंकेत दाखल, येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यभरात मान्सूनपूर्व सरी बरसणार

News Desk

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk