HW News Marathi
Covid-19

कोकणातील चाकरमानी २ दिवसांत जाणार आपापल्या गावी

रत्नागिरी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन सुरु आहे. अशातच अनेक चाकरमानी हे मुंबईत अडकले आहेत. या चाकरमान्यांना त्यांच्या गावी कसे नेता येईल याची योजना गुहागरचे भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना सांगितली होती. ती त्यांना पटली असून आता २ दिवसांत मुंबईत अडकलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी नेण्याचा निर्णय होईल, अशी माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

दरम्यान, तसेच, ज्यावेळी कोरोनाचा शिरकाव राज्यात झालेला नसतानाही त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात आपण सातत्याने या संदर्भात आपली भूमिका मांडली होते आता त्याला यश येत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. आणि आता २ दिवसांत त्यांना गावी नेण्यात येईल आणि तिथून काहींना मुंबईत आणायचे आहे.

मुंबईतून गावात जाणाऱ्या लोकांना एस-टीने ने-आण करण्यात येईल. यासाठी खासगी वाहतूक किंवा रेल्वे वापरण्यात येणार नाही. प्रवासादरम्यान, सोशल डिस्टन्स पाळण्यात येईल. तसेच, प्रत्येकाची वैद्यकीय तपासणीही करण्यात येईल, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरची जागा पटकावल्यानंतर समाधान अवताडे, परिचारक फडणवीस भेटीला !

News Desk

अखेर अमृता फडणवीसांनी घेतली लस !

swarit

‘रेमेडेसिविर’ची निर्यात थांबवली, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

News Desk