HW News Marathi
महाराष्ट्र

आज काय बंद आहे?

मुंबई : भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन करण्यात आले आहे

आज काय बंद आहे?

मुंबईतील डबेसेवाल्यांची सेवा बंद.

मुंबईतही बंदची हाक दिल्या मुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या मुळे सेवेवर परिणाम होतो यात डबे वेळेवर ऑफिस पोहचत नाहीत व ग्राहकांना याचा उपयोग होत नाही. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा, असं आवाहन मुंबईचे देंवल्यानी केले आहे.

 

लासलगावमध्ये बंदला पाठिंबा म्हणून बाजार समितीत कांद्याचे लिलाव दुपारी बारा वाजेपर्यंत बंद केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे

एमए, एमबीएचे अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते.परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

शाळा सुरु पण स्कूल बस बंद.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते साठी आज स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशन घेतला आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र शाळांना सुट्टी देण्यास नकार दिला आहे.

अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एसटीची वाहतूक कडेकोट बंदोबस्तात.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्षा-टॅक्सी सेवा बंद

ठाणे रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनाही सर्व रिक्षा-टॅक्सी बंद ठेवणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षासेवा बंद राहणार आहे.

“महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लोकांनी शांततेत बंद पाळावा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आम्ही कोणालाही आव्हान देत नाही आहोत, त्यामुळे प्रतिआव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो, असं करु नये. हा बंद शांततेत पार पडावा, अशी आमची इतर संघटनांना विनंती आहे.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली; फडणवीसांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर

Aprna

चिपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री कानात काय बोलले ? राणेंनी केला खुलासा

News Desk

‘जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही’, भाजप- मनसे संभाव्य युतीवर नाना पटोले गरजले!

News Desk