HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव हिंसाचार, तपासाची दिशा बदली – प्रकाश आंबेडकर

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार तपासाच्या दिशा बदल्या जात असल्याचा आरोप , भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते असे देखील म्हटले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी मोदींनी हत्येचा कट असल्याची आफवा उठवली जात आहे. मोदींना सध्या ७ झोन सिक्योरिटी दिली जात असून त्यांच्या सिक्योरिटीत वाढ करत १४ झोनची सिक्योरिटी देण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हिंदू-मुस्लिम समाजात दंगे घडवण्यात आता यश येत नाही. म्हणून आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात सरकर दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच सरकार आरक्षण विरोधी गटाला खुले आम मदत करत असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे.

तसेच भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्यात येत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधला. एल्गार परिषदेच्या आयोजकांना पकडणे हा पोलिसांचा कट असल्याचे देखील आंबेडकरांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवरुन सरकारवर तोफ डागली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली तर…”

News Desk

फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन अशी मी एजन्सी काढली; फडणवीसांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर

Aprna

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी संभाजीराजेंनी मांडले ३ पर्याय

News Desk