HW News Marathi
महाराष्ट्र

भुजबळ आणि वडेट्टीवार चेहरे चमकावायला आले होते,आरक्षणावर रावसाहेब दानवे यांची टीका!

नवी दिल्ली। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एका जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा तारीख जाहीर केली आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला जातोय. तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. अशावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जोरदार टोला लगावलाय.

ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही

1980 ते 1990 या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राज्य सरकारकडे होत्या. आता ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांवर गेलं आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाला इम्पिरिकल डेटा देऊ शकला नाही. राज्य सरकारनं आपल्या धुंदीत राहून वकिलांची फौज उभी केली नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण केवळ राज्य सरकारला गांभीर्य नसल्यामुळे गेल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय. त्याचबरोबर भुजबळ आणि वडेट्टीवार हे फक्त चेहरे चमकवण्यासाठी आले होते. ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही असं बोलत होते. पण तुमच्या चुकीमुळं आरक्षण रद्द झालं, असा थेट आरोप दानवे यांनी भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर केलाय.

महाविकास आघाडीचं हे सरकार पडेल

दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसबाबत उत्तर प्रदेशातील जमीनदाराचं उदाहरण दिलं होतं. त्याबाबत विचारलं असता, शरद पवार काँग्रेसबाबत खरं बोलत आहेत. पवारांनी मार्मिक टीका केलीय. शरद पवार स्वत: काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राहुल गांधींवर नाही तर काँग्रेसच्या स्थितीबाबत उत्तर प्रदेशातील जमीनदाराचं उदाहरण दिलं आहे. राज्यात शरद पवार यांच्या आधारामुळेच काँग्रेस सरकारमध्ये असल्याचंही दानवे यांनी म्हटलंय.एका ठराविक उद्देशासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. आपला उद्देश पूर्ण झाला की महाविकास आघाडीचं हे सरकार पडेल, असा आरोप दानवे यांनी केलाय. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती असल्याचा दावाही केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका व्हाव्या अशा विचाराचा एक गट या सरकारमध्ये होता, शेवटी त्यांचा मनसुबा पूर्ण झाला. आज ओबीसी समाजावर अन्याय करणारा सर्वात मोठा निर्णय झाला. त्यामुळे पुढच्या काळात सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील. हा मोठा घात राज्य सरकारनं ओबीसी समाजाबाबत केला आहे. ओबीसी समाज या सरकारला सोडणार नाही. भाजपनं ओबीसी उमेदवार देण्याचं जाहीर केलं आहे. पण महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. त्यामुळे ओबीसी समाज या सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी सरकारला दिलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फसवी कर्जमाफी’ शेतकऱ्याने लावला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा फ्लेक्स…

News Desk

भागवत करडांची यात्रा सर्वात आधी मुंडेंगडावरून!

News Desk

मराठा आरक्षणाचा मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार

News Desk