HW News Marathi
महाराष्ट्र

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाचा मोठा निर्णय!

ठाणे। फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानतंर आता ठाणे महानगरपालिका खडबडून जागी झाली असून ठाणे महानगरपालिका हद्दीत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करायला जाताना भविष्यातील होणारे चाकू हल्ले रोखण्यासाठी पालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षण, चाकू हल्ला संरक्षणचे धडे देण्यात आले. आजपासून 100 हून अधिक सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अचानक होणारे हल्ले कसे रोखावे

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार आजपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. एखाद्यावेळी अधिकाऱ्यांवर अचानक होणारे हल्ले कसे रोखावे, कशाप्रकारे स्वतःचे व अधिकाऱ्याचे रक्षण करावे? या करीता मार्शल आर्ट, ज्युडो यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करून घेण्यात आले. दि. लेजंट ऑफ मार्शल आर्ट, मुंब्रा या संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. यात 54 अंगरक्षक तसेच 45 महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षाकर्मिनी सहभाग घेतला होता.

हल्लेखोरांपासून रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात यावी

30 ॲागस्टच्या संध्याकाळीही साडे सहाच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली येथील यशराज इमारती समोर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्याने चाकूने हल्ला केला. ज्यात कल्पिता पिंपळे यांना 2 बोटे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांना 1 बोट गमवावे लागले होते. हा भ्याड हल्ला होता. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा आणि सुरक्षा रक्षकांचा बचाव हल्लेखोरांपासून रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात यावी यासाठी ठाणे महापालिकेने पाऊल उचलले असल्याचे यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांनी सांगितले.

अश्या प्रकारचे प्रशिक्षण देणे फायदेशीर आहेच पण जोपर्यंत फेरीवाल्यांचा बंदोबस्त होणार नाही तो पर्यंत असे हल्ले होतच राहतील. याचमुळे भ्रष्ट अधिकारी जेरबंद होत नाही तोपर्यंत आहे हल्ले होतच राहणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

News Desk

बदलत्या परिस्थितीस सामोरी जाणारी आरोग्य व्यवस्था निर्मितीस प्राधान्य द्यावे! – आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे

Aprna

देगलूरमधला विजय म्हणजे महाविकास आघाडीवरील जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब – धनंजय मुंडे

News Desk