HW News Marathi
महाराष्ट्र

देगलूरमधला विजय म्हणजे महाविकास आघाडीवरील जनतेच्या विश्वासावर शिक्कामोर्तब – धनंजय मुंडे

बीड। महाविकास आघाडी मजबूत व कोणत्याही आक्रमणाला परतवून लावायला सक्षम आहे हे सिद्ध करणारा निकाल देगलूर-बिलोली मतदारसंघातील जनतेने दिला आहे. महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास आहे यावर या निकालातून शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे.दिवंगत आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे याजागेवर पोटनिवडणुक झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा 40 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे.

जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील

या विजयाबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विट करून नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांचे व या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेही विशेष अभिनंदन केले आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या एकाच दिवसात 4 झंझावाती प्रचारसभा झाल्या होत्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला होता व आजचा निकाल हा त्या विश्वासाला सार्थ ठरवणारा असल्याचेही ना. मुंडेंनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी तब्बल महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उतरवली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत विधानसभेत धमाकेदार एन्ट्री केली.देगलूरचा निकाल दुपारी 3.30 च्या आसपास स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाचं चीज झाल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. सोनिया गांधी यांनी जितेश अंतापूरकर यांच्या राजकीय आयुष्याला शुभेच्छा देताना चांगलं काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

राजकारणाला चपराक लगावली

देगलूरच्या विजयाने अशोक चव्हाण यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची पुन्हा झलक पाहायला मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसंच देगलूर जिंकल्याने अशोक चव्हाण यांचं राजकीय वजनही चांगलं वाढलं आहे. तसंच अशोक चव्हाण यांचा आत्मविश्वासही चांगलाच दुणावला आहे. देगलूर हा विजय काँग्रेस व महाविकास आघाडीवरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतिक असून, मतदारांनी भाजपच्या द्वेषमूलक राजकारणाला चपराक लगावली आहे, अशा शब्दात देगलूरच्या विजयाचं महत्त्व अशोक चव्हाण यांनी अधोरेकित केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजवर्धन हंगरगेकर चेन्नई सुपर किंग्समधून खेळणार

Aprna

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डींचे निलंबन

News Desk

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील- संजय राठोड

News Desk