HW News Marathi
महाराष्ट्र

वीज कनेक्शन तोडी विरोधात राज्यभर भाजपचे टाळे ठोको आंदोलन

मुंबई | भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलाविरोधात भाजप आंदोलन करत आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकारचा ७२ लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय हा मोगलाई आहे. आधी १०० युनिट माफ करणार असं सांगितलं होतं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाल, फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही तर मग ही लोक पैसे कसं भरणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

७२ लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहे. वीज बिलाप्रकरणी भाजपचं टाळे ठोको आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. दरम्यान, आम्ही महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं, तेव्हा पोलिसांनी बळाचा चुकीचा वापर केला, काही पोलिसांनी शीवीगाळही केला, याचा आम्ही निषेध करतो, हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची नियमानुसार कारवाई होणार – अनिल देशमुख

News Desk

आमदार रवी राणा यांची प्रकृती खालवल्याने केले रुग्णालयात दाखल

News Desk

पवारांनी सांगितले… २०२४ मध्ये उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री असतील! – जितेंद्र आव्हाड

News Desk