HW News Marathi
महाराष्ट्र

….म्हणून राज्यात कधीही भाजपची सत्ता येऊ शकते!

सातारा | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असल्याचे भाकित केले आहे.मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेवर येईल, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं नव्हतं. कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार वादविवादात सुरू आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं. तसेच सध्या आमच्याकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र शासनाचीही आहे. केंद्राने कृषीविषयक केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी करावी, असं आठवलेंनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्राध्यापक पदासाठी लवकरच भरती सुरु होणार, उदय सामंतांची माहिती

News Desk

खडसेंच्या प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना विचारा, सुप्रिया सुळेंची खडसेंच्या प्रवेशावर प्रतिक्रिया

News Desk

तिथे पालकमंत्री ऑक्सिजन पुरवठ्यावर बोलले, इथे ऑक्सिजनअभावी रुग्णाने प्राण सोडले!

News Desk