HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील!

पुणे | प्रत्येक विषयासाठी राज्य सरकारने, सरकारमधील नेत्यांनी केंद्र सरकारला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचा सपाटा लावला आहे. अशाच पत्र लिहिण्याच्या प्रक्रियेवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा पुणेरी टोमणा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली.

फडणवीस-पवार भेट

फडणवीस-पवार भेटीबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती केली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

महाविकासआघाडीला वाटतं जनता मुर्ख आहे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी शाळांदेखील पाच दिवसांचा आठवडा करा अशी मागणी

swarit

अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा !

News Desk

५वी आणि ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाडांची घोषणा

News Desk