HW News Marathi
Covid-19

तेव्हा भाजपसोबत शिवसेना नसती तर राज्य कारभार अधिक चांगला झाला असता !

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “राज्यात २०१४-२०१९ दरम्यान जर भाजप शिवसेनेसोबत युती करुन सत्तेत नसती तर राज्य कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. काही कठोर निर्णय योग्य वेळी आणि वेगाने घेता आले असते”, असे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. एका ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर ही बोचरी टीका केली आहे. आता शिवसेनेकडून यावर काही प्रतिक्रिया येणार का ? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

“शिवसेना जरी सत्तेत होती तरी सरकारने कोणतेही निर्णय घेतल्यानंतर मात्र विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन टीका करायची. काही काळाने आपल्याला त्याची सवय होऊन जाते. शिवसेनेच्या अशा वारंवार घेतल्या गेलेल्या भूमिकेमुळे त्यानंतर मी ‘मला हवं ते मी करणार’ या भूमिकेत गेलो. भाजप शिवसेनेसोबत युती करुन सत्तेत नसती तर अधिक चांगला आणि वेगवान कारभार झाला असता. काही कठोर निर्णय वेगाने घेता आले असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा बिघाड अपेक्षित होता कि अनपेक्षित ? गाफिलपणा झालाय का ?” | मुख्यमंत्री

News Desk

भारतीयांच्या चिंतेत वाढ! गेल्या २४ तासांत देशातील कोरोना संख्या १ लाखांवर

Aprna

रामदेव बाबा यांनी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले आयुर्वेदिक औषध केले लॉन्च

News Desk