HW News Marathi
Covid-19

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाचे केले स्वागत

मुंबई | पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. पाटील पुढे म्हणाले, वारकऱ्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. आणि यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट पाहा पंढरपूरला न जाता आपल्या घरीच विठ्ठलाची पूजा करावी, असे आवाहनीही त्यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेबद्दल समाजात मोठी आस्था आहे. तर राज्यातील जनतेला वारीची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आपण सर्व वारकऱ्यांना केले आहे. आषाढीसाठी पंढरपूरला दरवर्षी लाखो लोकांनी जाण्याची परंपरा यंदा बाजूला ठेऊन आपण सर्वांनी घरीच विठ्ठलाची पूजा करून आषाढी एकादशी साजरी करणे गरजेचे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘धार्मिक आणि राजकीय गर्दीसाठी टाळण्यासाठी एकच धोरण ठेवा’, मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

News Desk

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

News Desk

लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे !

News Desk