HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!; वानखेडे प्रकरणावरून सोमय्या संतापले

मुंबई | मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरण सध्या नवनवीन आणि धक्कादायक वळणं घेताना दिसून येत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात दाव्या-खुलशांच सत्र सुरूच ठेवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधित घडणाऱ्या घटनांमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना आता भाजपचे वानखेडेंची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वानखेडे प्रकरणावरून थेट ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत किरीट सोमय्यांनी आता महाविकासआघाडीच्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

किरीट सोमय्या वानखेडे प्रकरणावर बोलताना म्हणतात की, “हे प्रकरण निव्वळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते.” तसंच, “ठाकरे सरकारची ही बदमाशी सुरु आहे. हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे. गेले १२ दिवस समीर वानखेडे दलित की मुस्लिम यावर वाद सुरु आहे. यामागचं कारण असं की अजित पवारांवर ११ दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना ह्या प्रकरणातून वाचवायचं आहे”, असं म्हणत सोमय्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी महाविकासआघाडीकडून समीर वानखेडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे.

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मी…!

किरीट सोमय्यांनी पुढे थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरलं आहे. “ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. ते सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. परंतु, तरीही सरकारने याबाबतची कारवाई थांबवली आहे. स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी इतरांना अडचणीत आणण्याचं आणि लक्ष विचलीत करण्याचं हे काम सुरु आहे”, असं सोमय्या म्हणाले. त्याचप्रमाणे, “येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मी अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे बाहेर काढणार”, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांदाचे एकलव्य एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा चढवतील

News Desk

‘चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न’, तर पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात!

News Desk

गोदावरीला पूर, जायकवाडीचा साठा 30 टक्क्यांवर

News Desk