HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारची चांगलीच ‘हजामत’ करून, कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केला – अतुल भातखळकर 

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने तयांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुरुवातीपासून भाजप अर्णब गोस्वामी यांच्या पाठीशी उभा होताच आता भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत व्हिडिओ ट्विट केला आहे.

भातखळकर असे म्हणाले आहेत की, “अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायावयाने दिलेला जामीन हा लोकशाहीचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यचा विजय आहे. द्वेष बुद्धीने आणि अहंकाराने वागणारऱ्या या महाभकास आघाडी सरकारला ही सर्वात मोठी चपराक आहे. अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळू नये आणि त्यांच्या विरोधात खोट्या केसेस टाकून रिपब्लिक मीडिया बंद करण्याचा अघोरी आणि हिटलर शाहीचा प्रयत्न होता. सर्वोच्च न्यायालयाने तो उधळून लावला, ही आनंदाची बाब आहे. या सरकारच्या गळचेपीच्या आणि जनहिताच्या धोरणा विरोधातील भाजपचा लढा यापुढेही चालू राहील”, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

ग्रामीण भागात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी तर शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग होतील सुरू!

News Desk

मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील- नवाब मलिक

News Desk