HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगाव निवडणूकांवरून आता संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील आमनेसामने !

अकोला | महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद सुरु आहेत. बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

नारायण राणे सक्षम आहेत

भाजपला काल(२ सप्टेंबर) मोठा धक्का बसला आहे. दोन नगरसेवकांनी समर्थकांसह काल शिवसेनेत प्रवेश केला. याकडे पाटील यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणे समर्थक फोडल्याची मला माहिती नाही. पण असं झालं असेल तर नारायण राणे त्याला सक्षम आहेत, असं ते म्हणाले आहेत.

आम्ही 45 प्लस जागा जिंकू

शिवसेना आणि भाजपमध्ये आता बेळगाव निवडणुकींवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आम आदमी पार्टी व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूकीतील रंगत व चुरस वाढली आहे. आज होत असलेल्या निवडणूकीत बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी बेळगावकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार असून आम्ही 45 प्लस जागा जिंकू, असा दावा अभय पाटील यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगाव पालिकेवर छत्रपती हंसिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवापूर मध्ये शेकडो शिवसैनिक भाजपात सामील

News Desk

वाधवान बंधूंना १० मेपर्यंत सीबीआयची कोठडी

News Desk

मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, नाना पटोले भडकले

News Desk