HW News Marathi
Covid-19

राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत, पण… !

मुंबई । राज्यातील प्रचंड वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करायचा की निर्बंध ह्यातून आता राज्य सरकारने मार्ग काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (४ एप्रिल) याबाबत मध्य मार्ग काढत राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. भाजपने देखील राज्य सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. “राज्य सरकारने अतिशय उत्तम असा निर्णय आहे”, असे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “राज्याचे मुख्यमंत्री चांगले मात्र त्यांना सल्ला देणारे योग्य नाहीत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री चांगले आहेत. पण मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारे योग्य सल्ला देत नाहीत. आम्ही उद्धव ठाकरेंना सहकार्य करायला तयार आहोत”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, दुसरीकडे “या अर्धवट लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात येणार का?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, एकीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केलेले असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार ! जयंत पाटलांची माहिती

News Desk

राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत

News Desk

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा

News Desk