HW News Marathi
महाराष्ट्र

“कोथळा काढायला दंडात ताकद आहे का?”, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मुंबई। महाराष्ट्रमध्ये सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद सुरु आहेत. संजय राऊत यांनी काल(४ सप्टेंबर) जुन्नर येथील एका कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही. असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच, शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असं देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

दंडात ताकद आहे का?

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत करत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. “कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? आता भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांसोबतच येणाऱ्या सर्व निवडणूका लढेल आणि जिंकेल !”, असं प्रत्युत्तर त्यांनी केलं आहे.

“लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली, त्यांच्याच नावाचा वापर करून राज्यात खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता शिवसेनेच्या १८ खासदारांनी भाजपाविना राज्यात जिंकून दाखवावे! खरा लढा आता सुरू झाला आहे.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिलेले आहे.

आम्ही समोरून कोथळा काढतो

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती, त्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk

“आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे”,धनंजय मुंडेंचा भाजपवर वार

News Desk

“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”, आशिष शेलारांची सरकारवर टीका

News Desk