HW News Marathi
महाराष्ट्र

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे,येर गबाळ्याचे काय काम !!अभंगाचा संदर्भ देत फडणवीसांचा सरकारला टोला

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

राज्य सरकारनं राज्यपालांना दिलेल्या भाषणात आम्ही हे केलं आणि ते केलं, याचाच उल्लेख केला.

कोविड सेंटर्स उभारली, जम्बो कोविड सेंटर्स बांधली, प्रयोगशाळ्या उभारल्या, अशा गोष्टी राज्यपालांच्या भाषणात होत्या. पण आकडेवारी अजिबात नव्हती. सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे किती जणांचे प्राण वाचले, किती जणांच्या चाचण्या झाल्या, याची कोणतीही आकडेवारी सरकारनं दिली नाही. किमान या कोविड सेंटर्समुळे किती जणांची घरं भरली, याची तरी माहिती द्यायला हवी होती, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शेतकरी प्रश्न, त्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई, थेट परकीय गुंतवणूक, वीज बिल यासारख्या अनेक विषयांवरून फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. त्यांनी भाषणाच्या शेवटी संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला दिला. संत तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ देत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

‘नका दंत कथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण !!

अनुभव येथे पाहिजे साचार ! न चलती चार आम्हांपुढे !!

वरी कोण मानी रसाळ बोलणे ! नाही झाली मने ओळखी तो !!

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ! राजहंस दोन्ही वेगळाली !!

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम !!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, आता मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांनाही भेटणार!

News Desk

मंदिरं, जिम, रेस्टॉरंटबाबत या आठवड्यात निर्णय घेणार

News Desk

मुख्यमंत्र्यांविरोधात २३ जुलैला सर्वोच्च न्यायालय देणार अंतिम निकाल

News Desk