HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरु केलंय. अशावेळी मुंबईत भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.

नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला आहे

महाविकास आघाडी सरकार कशाप्रकारे दडपशाही करत आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना प्रोटोकॉल न पाळता अटक करण्यात येत आहे, असा आरोप भाजप नेते करत आहेत. तसंच नारायण राणे यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांची शुगर लेवल आणि ईसीजी करता आला नाही, असं वैद्यकीय पथकानं म्हटलंय. त्यामुळे राणे यांची वैद्यकीय तपासणीतही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. या पार्श्वभूमीवर आता विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. आता राज्यपाल कोश्यारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. इतकंच नाही तर राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी’च वरळीचा आमदार असणार !

News Desk

महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आम्ही केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

News Desk

Hw Exclusive | खुप मोठ्या प्रमाणात कर्ज काढावे लागणारचं आहे

Arati More