HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट व नील सोमय्यांशी संपर्क होत नसल्याची गृहविभागाची माहिती

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या संपर्क होत नसल्याची माहिती गृहविभागाने दिली आहे. हे दोन्ही पिता-पुत्र गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती गृहविभानाने दिली आहे. आयएनएस विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली पैसे जमावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पिता-पुत्र सोमय्यांशी मुंबई पोलिसांचा संपर्क सांधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांना त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. “आरोप करणे सोप्पे असते, आणि स्वत: वर आरोप झाले की, आपण समोरे जायाचे नाही. हे काही शूर पणाचे लक्षण नाही,” असा टोला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज (१२ एप्रिल) प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. 

  किरीट सोमय्यांना झेड सुरक्षा असून देखील ते गायब आहेत, आणि केंद्र गृहविभागाला काही प्रश्न विचारू शकते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “केंद्राला विचारून की, तुमची सुरक्षा असलेले लोक कुठे आहेत. आरोप करणे सोपे असते, आणि स्वत: वर आरोप झाले की, आपण समोरे जायाचे नाही. हे काही शूर पणाचे लक्षण नाही. राज्य सराकर आणि पोलीस कोणत्याही विषयात अटक करेल, अशी भीती असल्यामुळे ते गायब असतील, यावर ते म्हणाले, राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्धभवत नाही. पोलीस कायद्यानुसार, योग्यती कारवाई करते.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे – अजित पवार

News Desk

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेणार! – अजित पवार

Aprna