HW News Marathi
महाराष्ट्र

सोमय्या खोट्या सहीनिशी FIR नोंदविल्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. सोमय्या हे बोगस एफआयआर विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.  खोट्या सहीनिशी एफआयआर नोंदविली असून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या गंभीर आरोप केले आहे. आणि या प्रकरणी कारवाई न झाल्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार असल्याचे सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. सोमय्या येणार या पार्श्वभूमीवर खार पोलीस स्टेशनबाहेर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

 गेल्या दीड तासाभरातापूसन सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात आहेत. सोमय्यांसोबत त्यांच्या वकिलांची एक टीम देखील त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत. “मुंबई पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का?, एफआयआरमध्ये माझी सहीच नाही. यात राज्य सरकारची बनवाबनवी पडकली गेली. महाराष्ट्र पोलिसांनी गुंडाना मदत केली,” असा गंभीर आरोप सोमय्यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर केला आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

राणा दाम्पत्याना हनुमान चालिसा प्रकरणी २३ एप्रिलला  पोलिसांनी अटक केले होते. राणा दाम्पत्याना भेटण्यासाठी सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला गेले होते. सोमय्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी पोलिसांना आपण येणार असल्याची माहिती दिली होती. जेव्हा सोमय्यांची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. तेव्हा सोमय्यांच्या गाडीवर चप्पल आणि दगडफेक झाली असून यात सोमय्या जखमी झाले होते. मी पोलीस स्टेशनला रात्री साडे नऊच्या सुमारास येणार असल्याचे कळावले होते. मी पोलीस स्टेशनला येण्याआधीच ७० ते ८० शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनच्या आवारात आणि दराजवळ जमले होते. माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर शिवीगाळ करण्यात आली. आणि माझी गाडी थांबवण्याचाही प्रयत्न केला असून मी परत जात असताना तरही माझ्यावर हल्ला झाला. मी जबाबदारी म्हणून पोलिसांना सांगितले. परंतु ते म्हटले की आम्ही सगळी व्यवस्था केली असून पोलीस स्थानकाचे दार उघडताच बाहेर असलेले ७० ते ८० गुंडांच्या हवाले माझी गाडी दिली. हे सर्व पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केले. यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेवढे पाणी शेतात आहे त्यापेक्षा जास्त पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाले – पंकजा मुंडे

News Desk

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कलाकार, पण मला आपली कला शिकवत नाहीत !

News Desk

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

News Desk