HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे, आघाडी सरकारवर भाजपचा निशाणा 

मुंबई | शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचा भडका देशभरात उडाला आहे. सर्वच राज्यांमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटत असून, अनेक राजकीय पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेनं दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केला आहे.

शिवसेनेनं उद्या पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला खडेबोल सुनावले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “होत असलेलं आंदोलन आणि आंदोलनाला राजकीय पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा याबद्दल आश्चर्य वाटत आहे. जे पक्ष निवडणुकीत सातत्यानं पराभूत होत आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून कृषीकारण नव्हे, तर आपलं राजकारण करायचं आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या भविष्याची चिंता आहे. शेतकऱ्यांचं भविष्य त्यांच्यासाठी गौण आहे,” असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

“या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचं ४८ वर्ष दोन महिने सरकार होतं. देशात ५२ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं सरकार होतं. ज्याला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणायचो, मग त्या कृषी क्षेत्रात असं काय झालं? का व्याख्या बदलली याचं कधी चिंतन केलं का? आज काही राजकीय पक्ष मी नेत्यांबद्दल बोलत नाही. त्यांना राजकीय विस्मरणाचा आजार झाला. त्याला आपण पॉलिटिकल अल्झायमर हा शब्द वापरू शकतो,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर अप्रत्यरित्या निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन दर ५ रुपयांनी कमी करुनही पुन्हा १८ पैशांनी महागले

swarit

पहिले कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला…

swarit

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

Aprna