HW News Marathi
महाराष्ट्र

जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा – सुजय विखे पाटील

शिर्डी | ‘राज्यातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर आरोप करणे चुकीचे असून जर केंद्र सरकारवरच अवलंबून राहणार असाल तर तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेच कशाला?’ असा प्रश्न भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सरकारला विचारला आहे. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही यावेळी सुजय विखे यांनी केली आहे.

‘राज्यातील प्रश्न सोडवायची जबाबदारी आघाडी सरकारची आहे..जनतेने नाकारलेलं असताना तीन पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्ता भाजपाकडे सुपूर्द करा,’ असे कडक शब्दांत सुजय विखे पाटील यांनी आघाडी सरकारला सुनावले आहे.

तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय असून आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांचा संजय राऊत यांनी अपमान केला आहे. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणीही खासदार सुजय विखेंनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांपेक्षा आपण आणि आपला पक्ष जर हुशार आहात तर कोरोना का थांबवला नाही? असा थेट सवालही खासदार सुजय विखे यांनी राऊतांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

News Desk

“बाळासाहेब थोर आहेत, मग त्यांच्याच संपत्तीची चौकशीची मागणी का केली? ” दीपक केसरकारांचा नारायण राणेंना सवाल

News Desk

“शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी जे सांगितलं, ते आम्हाला २ वर्षापूर्वी कळलं!”

News Desk