HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

उदगीर । ‘सच का साथ, सबका विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे ‘सच्चे उमेदवार असून, पदवीधर, विद्यार्थी यांच्या शैक्षणिक, रोजगार यासह शेती, सिंचन अशा अनेकविध प्रश्नांवरील त्यांच्या आजपर्यंतच्या कामाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित पदवीधर मेळावा व जाहीर सभेत मुंडे बोलत होते.

असे गाडा की, पुन्हा मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवायचा ‘नाद’ भाजप करणार नाही !

पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपने मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उतरण्यापूर्वीच आत्मविश्वास गमावला आहे, भाजप मधील उमेदवारीचा गोंधळ, अंतर्गत बंडाळी आदी बाबींवरही लक्ष वेधत चांगलीच टोलेबाजी केली. “सत्ता नसल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. मराठवाडा पदवीधर निवडणूक ही सुशिक्षित लोकांना सत्तेसाठी हपापलेल्या व महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याची एक संधी असून, या निवडणुकीत भाजप ला असे गाडा की, पुन्हा मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवायचा ‘नाद’ भाजप करणार नाही”, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी उपस्थितांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपल्या आईची हत्या करुन अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली”, अर्णब गोस्वामींच्या वकीलांचा युक्तीवाद

News Desk

भाजप आमदाराकडून MIM च्या खासदाराचं कौतुक!

News Desk

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा! – मुख्यमंत्री

Aprna