HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलनही करत आहोत”, मनसेचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

डोंबिवली | महाविकास आघाडी सरकारने लावलेल्या नियमांचा विरोध करत विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. यालाच काल(३१ ऑगस्ट) या आंदोलनकर्त्यांवर टीका केली आहे. त्यालाच आज(१ सप्टेंबर) मनसे आमदारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलनही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? असा सवाल करत एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही, असा इशारा राजू पाटील यांनी म्हटले आहे.

पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला?

राजू पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, “काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही.”

“दुसरी लाट आली तेव्हाच लसीकरणासाठी केंद्र उभारण्यास सुरुवात केली. पालिकेकडे गेलो आयुक्तांना भेटलो, त्यांना सांगितलं आम्हाला चार-पाच लसीकरण केंद्रे उभारायची आहेत, त्याला परवानगी द्या, तुमच्या लसी येतील, त्या लोकांना मोफत टोचून देऊ, पालिकेचाही खर्च होणार नाही. पण त्याच्याकडेही दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ जानेवारीला जो लसीकरणाचा कार्यक्रम चालू झाला आहे. त्यानंतर पालिकेने अडीच ते पावणे तीन लाख डोस दिले आहेत. रोजची सरासरी काढली तर १५०० आहे. एवढ्या हळूहळू लसीकरण होणार असेल, तर पूर्ण केडीएमसीचे लसीकरण व्हायला दोन वर्षे लागतील”, असे राजू पाटील म्हणाले आहेत.

ज्यांना आंदोलन करण्याची खुमखुमी आहे त्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन करा..

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन करा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही….

काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट कोरोना वाटप. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली का?

केंद्र सरकारने राज्य सरकारला सणांमध्ये निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. हे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत का? बाकीच्या राज्यांच काय? जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहीहंडीसाठी मुख्यमंत्र्यांना फोनवर विनवणी, परवानगी न दिल्यास आशिष शेलारांचा आंदोलनाचा पवित्रा!

News Desk

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्ववत होणार – विजय वडेट्टीवार

News Desk

डहाणू-सांगलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत

swarit