HW News Marathi
महाराष्ट्र

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”, राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर

मुंबई | कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला आहे.

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”, राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तरबई | कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला आहे.

शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच मात्र शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी सरकारला विचारला आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं शेलार म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले होते?

छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडी चौकशी संदर्भातल्या वक्तव्यावरुन किरीट सोमय्या शरद पवारांवर संतापले

News Desk

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी | पृथ्वीराज चव्हाण

swarit