HW News Marathi
Covid-19

“…तेव्हा कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली ?” पडळकरांनी भाई जगतापांना डिवचले

मुंबई । मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. निमित्त आहे MPSC आणि UPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या ठाकरे आणि केंद्र सरकराच्या निर्णयाचे. MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यात गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांसह जोरदार आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर UPSC परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावरुन भाई जगतापांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला होता त्याला आता पडळकरांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईला बसलेल्या Tauktae चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर गोपीचंद पडळकरांनी पलटवार केला आहे.

भाई जगताप यांनी UPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही. काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता? #वसूली_सरकार”, अशा शब्दात पडळकर यांनी भाई जगताप यांना सुनावले आहे.

 

काय म्हणाले होते भाई जगताप ?

भाई जगताप १७ मे रोजी एक ट्वीट करुन भाजपवर टीका करत म्हणाले होते की, “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे. केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का? #महाराष्ट्रद्रोही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या जवळ

News Desk

कोरोना रुग्णांच्या मृतदेहात व्हायरसचे किती वेळ राहतो ?, ICMR काय म्हणते ?

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk