HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन 

मुंबई | वीज मुद्द्यावरुन भाजपने वेळोवेळी आक्रमक भुमिका घेतली आहेच. आता पुन्हा एकदा भाजपने हा मुद्दा उचलून घेतला आहे. राज्य सरकारने दमदाटी करुन, पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांची वीज कापली. फसवी कृषी संजिवनी योजना आणली. शेतकऱ्यांकडे ५० टक्के वीज बिल भरायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. कोणतंही डिस्कनेक्शन न करता शेतकऱ्यांना वीज देता येते, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आतापर्यंत फक्त २० टक्के शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. त्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या २३ तारखेपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर २४ तारखेला राज्यातील २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन होणार असल्याची घोषणाही बावनकुळेंनी केलीय. त्यामुळे वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता जेलभरो आंदोलनाची घोषणा बावनकुळेंनी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

राज्य सरकार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार एरवी ट्वीट करतं पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणिवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे! – वर्षा गायकवाड यांचे आवाहन

Aprna

गुजरात मधील भक्ताने अर्पण केला शनीचरणी १९ लाखांचा कलश

News Desk

राज्यात राष्ट्रपती राजवट येणार? राज्यपालांवरील टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Aprna