HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित !

मुंबई | “शिवसेना-भाजपची युती निश्चित आहे. यंदाच्या विधानसभेचे जागावाटप आणि सत्तेत भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित आहे “, असे स्पष्ट विधान भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे, आम्ही येत्या विधानसभेत २२० जागा जिंकू, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांची नुकतीच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२६ जून) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणूक

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखेबाबत अंदाजही व्यक्त केला आहे. “राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडेल”, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल आणि १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान निवडणुका पार पडतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवारांना पराभूत करणे हा केवळ आशावाद

“यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पराभव करणे हे माझे ध्येय आहे. परंतु, प्रत्यक्षात ते काही शक्य नाही. मी अजित पवारांना पराभूत करेन असे म्हटले तर तुम्हाला हसू येईल. कारण, हा केवळ आशावाद असू शकतो. मात्र, बारामतीत विजय मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर, पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवारांची मागणी

Aprna

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,काय तक्रार केली ?

News Desk

आमची सत्ता आली तर मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू !

News Desk