HW News Marathi
महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

मुंबई | “लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशानंतर मात्र विरोधकांनी इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केले गेले. जर ईव्हीएमवर राष्ट्रवादी काँग्रेस शंका उपस्थित करताना बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या,” असा सवालही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना विचारला. पाटील पुढे असे देखील म्हणाले की, “जर खरच ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असे वाटत असेल तर बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.

जिथे भाजप उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजप निवडणूक लढणार आहे, हे जाणून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याचे आदेश पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (२१ जुलै) गोरेगावमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली त्यावेळी बोलताना पाटील यांनी हे विधान केले आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बांगडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश सहस्त्रबुध्दे व श्याम जाजू यांच्यासह अनेक मंत्रीगण, खासदार, आमदार आणि प्रतक मंडळमधून आलेले हजारो पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढील सुनावणीपर्यंत दोघांचा मुक्काम कारागृहात

Aprna

येत्या रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार!

News Desk

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

News Desk