HW News Marathi
देश / विदेश

पवारांच्या बंगल्यावर भाजप ‘जय श्रीराम’चे ५० हजार पोस्टकार्ड पाठवणार

बीड | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने आज (२२ जुलै) बीड जिल्ह्यातील परळीमध्ये पोस्ट ऑफिससमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी “भाजपकडून बीड जिल्ह्यासह सबंध भारतातून “जय श्रीराम’ लिहिलेली ५० हजार पोस्टकार्डस शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर पाठवण्यात येतील”, असे भाजपच्या युवा मोर्च्याचेवतीने सांगण्यात आले आहे. कोरोना काळात प्राधान्य काय हे लक्षात घ्यायला हवे अशी भूमिका मांडत अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले.

शरद पवार नेमके काय म्हणाले ?

“राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवारांनी पंतप्रधांना लगावला होता. “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल असे काहींना वाटते. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त कोरोनाचे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा आहे”, असे शरद पवार त्यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर इंडियाच्या विमानची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

swarit

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

Aprna

न्या. लोया मृत्यूप्रकरण | चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

News Desk