HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, भाजपने घेतला युटर्न! 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतला भाजप आमदार राम कदम यांनी समर्थन केले या त्यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात वर केले आहेत. कंगनाचे समर्थन करणाऱ्या भाजपने यू टर्न घेतला आहे. या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत आमदार आशिष शेलार यांनी सारवासारव केली आहे. राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगनाची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले आहेत. कंगना राणावतने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. आपण पोकळ धमक्या देत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगणाचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपनेही मुंबईप्रश्नी विधानावर सावरासावर केली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप केला आहे. मुंबईत पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी परिस्थिती झाली असल्याचेही तिने म्हटले आहे.

काय म्हणाले होते राम कदम?

राम कदम यांनी काल (३ सप्टेंबर) ट्विट करून म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेतील एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना राणावतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे. कंगना राणावतने मुंबईत येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, कंगना मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? कंगना ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत आहे, असे कदम यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरू होणार

swarit

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मुख्यमंत्री गेले राजभवनावर!

News Desk

“… म्हणून मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला”, कारण सांगताना माजी आमदाराच्या डोळ्यात पाणी

News Desk