HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

नवी दिल्ली | “माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षला दिला आहे. भाजपच्या शनिवारी (७ डिसेंबर) पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या विभागनिहाय कोअर कमिटीची बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज (९ डिसेंबर) दिल्लीला जावून भाजप नेत्यांशी नव्हे तर राष्ट्रवादीचे अधक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथवरील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

खडसेंना भाजपकडून विधानसभेचे तिकीट देण्यात आले नाही, त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसेंना तिकटी देण्यात आले. तसेच निवडणुकीत रोहिणी खडसेंनाच पक्षातील लोकांनी पराभव केल्याचा आरोप खडसेंनी नुकताच गेला होता. यावर भाजप अंतर्गत सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट झालेच. त्याचबरोबर खडसे हे वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेऊ लागले.

बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेले आहे. यासंदर्भातील खडसेंनी केलेल्या आरोपानंतर भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करुन कुणी दोषी आढळले तर कारवाई करण्याचे आश्वासन खडसेंना दिले होते.

खडसे जळगावच्या बैठकीनंतर काय म्हटले

“मी पक्ष सोडणार नाही,” असे खडसेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मात्र, जळगावमध्ये जिल्ह्याची मिटींग होती. “उत्तर महाराष्ट्राची मिटींग होती. तर मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या बैठकीसाठी बोलवले. मला निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे. मला आता कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. अशा प्रत्येक ठिकाणी अन्यायाने वागणूक होत, असेल जाणीवपूर्वक मला दूर ठेवत असतील तर मी काय करावे,” असे अनेक सवाल खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांना बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत ठरले तर…खासदार संभाजीराजेंचा सरकारला इशारा

News Desk

पर्यावरण आणि पर्यटन खाते मिळाल्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले…

News Desk

पुढच्या ३-४ दिवसांत आकडा वेगाने वाढेल पण परिस्थिती नियंत्रणात असेल !

News Desk