HW News Marathi
महाराष्ट्र

भागवत करडांची यात्रा सर्वात आधी मुंडेंगडावरून!

नवी दिल्ली। भाजपच्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाची जनयात्रा ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून आशीर्वाद यात्रा काढावी लागणार आहे.यानुसार महाराष्ट्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. यात्रेची सुरवात करण्यापूर्वी कराड हे पंकजा मुंडे घरी जाणार आहेत. त्यानंतर गोपीनाथगडावरून यात्रा सुरू होईल. दरम्यान, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांचीही आशीर्वाद यात्रा निघणार आहे.

पंकजा मुंडे या निवडीने नाराज

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारा दरम्यान राजकीय वातावरण चांगलंच पेटलं होतं. पंकजा मुंडे या निवडीने नाराज असल्याचे चित्र होते. नंतर पंकजा यांनीच या मुद्द्यांवर पुढे येत स्पष्टीकरण दिले आणि यावर पडदा पडला. आता कराड यांना आशीर्वाद घेण्यासाठी लोकांमध्ये जायचे आहे. त्यापूर्वी ते पंकजा यांची भेट घेणार आहेत. महिनाभर दिल्लीतील वास्तव्यानंतर ते मराठवाड्यात जाणार आहेत. याबद्दल पंकजा यांच्याशी काही बोलणे झाले आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, गोपीनाथगडावरून यात्रेची सुरवात करायची असे आमचे ठरले आहे.

गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेणार

‘‘मराठवाड्यात गेल्यानंतर परळीत गोपीनाथगडावर जाऊन तेथे दर्शन घेणार आहे. नंतर आशीर्वाद यात्रेस सुरवात होईल. त्यापूर्वी पंकजा यांच्या घरी जाणार असून त्यानंतर गडावर जाणार आहोत. तेथून कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ही यात्रा सुरू केली जाईल. या विषयी पंकजाताईंबरोबर बोलणे झाले आहे.’’ असे सांगत या यात्रेत पंकजा सहभागी होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. विस्तारानंतर मोदी यांनी पत्रकारांशी जास्त बोलू नका, असा सल्ला दिला होता. मात्र, यात्रेदरम्यान कोणत्या विषयावर बोलायचे याबाबत काही बंधन पक्षाच्या स्तरावरून घातले आहे का, असे विचारल्यावर, बोलण्यासाठी बंधन घातले जात नाही, असे कराड यांनी स्पष्ट केले आहे.

महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार

आशीर्वाद यात्रेत आम्हाला पाच लोकसभा मतदारसंघात जाण्यास सांगितले आहे. या भागातील केंद्र सरकारी योजनांची माहिती घेतली जाईल, त्यांची प्रगती पाहिली जाईल. कामे सुरू असतील, तर त्याचा आढावा घेतला जाईल. तसेच त्या त्या भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप करणार आहे, असे कराड म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये लागू केलेला ‘मार्शल लॉ’ म्हणजे काय ?

swarit

“गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही”

swarit

विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna