HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट समुद्रात उलटली, ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश

मुंबई | मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट अलिबागजवळच्या समुद्रात उलटल्याची दुर्दैवी घटना आज (१४ मार्च) घडली. यावेळी बोटीत ८८ प्रवासी होते, मात्र सुदैवाने सर्वांची सुखरुप सुटका झाल्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. अलिबागजवळ बोट खडकावर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर बोट एका दिशेने कलंडली होती. मात्र मांडवा पोलिस कर्मचारी प्रशांत घरत आणि ‘सद्गुरु कृपा’ बोटीचे दोन खलाशी बचावकार्याला तात्काळ आले. या घटनेत ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

पोलिसांच्या पेट्रोलिंग बोटीवरुन बहुतांश प्रवाशांना सुखरुप जेट्टीवर पोहचवण्यात आले. अन्य काही जणांना स्पी़ड बोटीच्या मदतीने किनाऱ्यावर पोहोचवण्यात आले. सर्व प्रवाशांची वेळीच सुटका झाल्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, या आधी अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटला दीड वर्षांपूर्वी अपघात झाला होता. ही बोटही खडकावर आदळून बुडाली होती. बोटीवर असलेल्या २५ जणांपैकी २४ जणांना वाचवण्यात यश आले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील कोंढवा बुद्रुकमध्ये बनावट पनीर कारखान्यावर कारवाई

Manasi Devkar

देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती!

News Desk

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, मनसेने उडवली खिल्ली

News Desk