HW News Marathi
महाराष्ट्र

इस्लामपूरच्या सीमा सील करण्यात आल्या – जयंत पाटील

सांगली | कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी आज (२८ मार्च) संवाद साधला. दरम्यान, सांगलीत एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेचे वातारण जरी असले तरी त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली. तसेच, कोल्हापूरातून १ कोरोनाबाधित सांगलीत आल्याने सांगलीतील संख्या २४ वर गेली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सांगलीत हा विषाणू परदेशातून आलेल्या लोकांमूळे आला.सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७६ लोक परदेशात गेले होते. त्यातील ५० रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३७ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर एकूण ६९४ लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे त्यापैकी १३२ व्यक्तींनी १४ दिवसांचा हा कालावधी पूर्ण केला आहे. तर, ८६२ व्यक्तींना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच, इन्सटिट्यूटमध्ये क्वॉरंटाईन असणाऱ्यांची संख्या ३२ असून इस्लामपूर शासकीय वसतिगृहात २४ तर सांगली येथील क्रिडा संकूलनात ८ व्यक्ती आहेत. दरम्यान,या सगळ्यांवर कडक देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तसेच, राज्यात असे अनेक कुटुंब असतील की ज्यांनी पदेशात जाऊन आलेल्याची माहिती लपवली असेल किंवा विमानतळावर त्याकाळात इतकी माणसे आली की त्यांना फक्त ताप आहे की नाही ही प्राथमिक चाचणी करुन सोडून देण्यात आले कारण त्यांच्यात कोरोनाची त्यावेळी कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. त्यामूळे त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का असला आणि ते तरीही घराबाहेर गेले तर ही गंभीर बाब असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, लॉकडाऊन असूनही नागरिक बाजारात, रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेतच. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी आपण एकी दाखवायला हवी. ही साखळी मोडायची असेल तर घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांना अत्यावश्यक सेवा कमी पडू नये यासाठी सरकार काम करत आहे. वाहतूकीसाठी शेतकऱ्यांना मूभा देण्यात आली आहे. त्यामूळे नागरिकांनी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करु नका असे त्यांनी आवाहन केले आहे. तसेच, आरोग्यंत्री, राज्य सरकार सांगत आहेत त्यासूचनांचे पालन करा, घराबाहेर पडू नका असेही त्यांनी म्हटले. ज्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का आहे त्यांनी घराबाहेर पडणे टाळा असे आवाहन जयंत पाटलांनी नागरिकांना केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

Aprna

“कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, अजित पवारांचा भास्कर जाधवांना टोला

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

News Desk