HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाने काढला ‘हा’ तोडगा

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्येत वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (९ एप्रिल) मंत्रिमंडळ मंत्र्यांची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. राज्यातील कोरोनाचे वाढेत संकट पाहात मंत्रिमंडळच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची गैरहजरीने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, अनुपस्थितीचे कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांच्या पदावर आता तांत्रिक संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे राज्य विधान परिषदेचे निवडणूक लांबणीवर केली आहे.

“आज कोरोना आणि मुख्यमंत्रांना येत्या ६ महिन्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्यातरी एका सभागृहाचा संसस्य होणे हे बंधनकारक असल्याने यावर चर्चा करण्यासाठी कॅबिनेटची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राज्याच्या विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांपैकी दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यापैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस कॅबिनटे मंत्री राज्यपालांकडे करणार आहे,” अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री अनुपस्थित राहणे हा जाणून बुजून निर्णय घेतला असून आजची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. कोरोनामुळे निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणूका लांबणीवर गेल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा

Aprna

महाराजांमुळेच महाराष्ट्राला इतिहास, बाकी इतर प्रांतांना फक्त भुगोल! – संजय राऊत

Aprna

जळगाव: महिला वसतिगृहात काय झाले याची माहिती न घेता जळगावची बदनामी करु नका, खडसेंनी भाजपला ठणकावले

News Desk