HW News Marathi
Covid-19

अनिल देशमुखांना CBIकडून समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी

मुंबई । राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर एका पाठोपाठ एक अडचणी येत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोंडी झाली आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम राखत सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवरील आरोपांच्या CBIचौकशीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता CBI ने अनिल देशमुखांना समन्स पाठवला आहे.

CBIकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची येत्या १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर ही चौकशी करण्यात येणार आहे. याच CBIचौकशीच्या निर्णयामुळे अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. दरम्यान, यापूर्वी रविवारी (११ एप्रिल)अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची चौकशी करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने CBIचौकशीचा आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली होती. याठिकाणी त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात देखील अनिल देशमुखांना दणका मिळाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

News Desk

“…तरी महाराष्ट्राला लॉकडाऊनची गरज”, राजेश टोपेंचं ठाम मत

News Desk

कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर धारावीने नाव नोंदवलं

News Desk