HW News Marathi
महाराष्ट्र

CBIचा अनिल देशमुख यांना पुन्हा झटका, TRP घोट्याळात होणार चौकशी!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शरद पवारांचे निकटवर्तीय, तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने अजून झटका दिला आहे. सीबीआय अनिल देशमुख यांची टीआरपी घोटाळ्याशी संबंधित चौकशी करणार आहे. आधीच १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. त्यात अजून एका चौकशीची भर पडल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

अनिल देशमुख यांचा वाटा होता का?

टीआरपी घोटाळा प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे याने ३० लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालय तपास करत आहे. चौकशीचा त्रास देऊ नये यासाठी वाझेला बार्कने लाच दिली होती. यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वाटा होता का? या ३० लाखांपैकी किती रक्कम अनिल देशमुख यांना पोहोचली? याची चौकशी सीबीआय करणार आहे

याकडे सर्वांचं लक्ष लागून

वाझे नोव्हेंबरमध्ये टीआरपी प्रकरणाची चौकशी करत होते, तेव्हा पोलिसांच्या चौकशीचा छळ थांबवण्यासाठी बार्कने ३० लाख रुपयांची लाच दिली होती आणि बार्कने हे मान्य केलं होतं. ही लाच मुंबई बाहेर देण्यात आली. वाझेच्या टीमने ही लाच घेतली. बार्कच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे. यासंदर्भातील चौकशी सुरु असून बार्कचा हा आरोप खरा असल्याचं दिसून येत आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, हे अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून वाझे यांनी लाच घेतली का? हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सीबीआय टीमने झडती घेतली

१०० कोटी वसुली प्रकरणी बुधवारी सीबीआयने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकले. दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर मधील घरावर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजगृहावर झालेल्या तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी केले शांततेचे आवाहन

News Desk

पुरामुळे औरंगाबादमध्ये मोठं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची खासदार जलील यांची मागणी!

News Desk

पीक विमा भरण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ द्या-अशोक चव्हाण

News Desk