HW News Marathi
Covid-19

केंद्र सरकारच्या विशेष पथकाने केले वरळी कोळीवाड्याचे विशेष कौतुक

मुंबई | देशात पसरलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य प्रशासनाच्या मदतीने प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या ५ सदस्यीय पथकाने पर्.वरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील उपाययोजनांचे कौतुक केले. मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी कोळीवाड्याने देशाला उत्तम उदाहरण दिले आहे, असेही या पथकाने म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे पथकाने कौतुक केले आहे. तसेच, वरळीत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमूळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदतच होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले. वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधितांनी हिंमत दाखवत या कोरोनाशी सामना केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…यंदाचे शैक्षणिक वर्ष असे असणार

News Desk

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

मुंबईत होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी!

News Desk