HW News Marathi
देश / विदेश

‘चिपळूणमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळेल’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

मुंबई | चिपळूणमध्ये पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. वाढत्या पाण्याच्या प्रभावामुळे वीज सेवा खंडित केली आहे. वीज नाही, पाणी नाही, अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिेट तातडीने पुरवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही मागणी केली आहे.

सरकारकडून पूर्ण सहकार्य

राजकारणात हेवेदावे तर असतातच परंतु संकटकाळी सगळेच एकत्र येतात. याचंच उदाहरण म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून केंद्र कडून पूर्ण सहकार्य केलं जाईल अशी माहिती दिली आहे. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे पुरवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

चिपळूण आणि महाड मधल्या पुराचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलं आहे. पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पूरग्रस्तांना मदत

पुरात अडकलेल्या लोकांना अण्णा, पाणी काहीच उपलब्ध नसल्याने अनेक संस्था आता पुढे येऊन मदत करत आहेत. माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. अजून 2000 अन्नाची पाकिटे तयार होतील. याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना आणि माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडें आमने-सामने

News Desk

भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादी – समाजवादी पार्टीची युती!

News Desk

अजित पवारांच्या निकटवर्तीयावर ED कारवाई, साखर कारखान्यावर जप्ती

News Desk