HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई। ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणतीही निवडणूक घेऊ नये अशी भूमिका ओबीसी मंत्री आणि भाजपने घेतलेली असताना देखील पोटनिवडणुका जाही झाल्या आहेत. पोटनिवडणुका जाहीर झाल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवडणुका मागे घेण्यासाठी सांगणार आहोत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसंच आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत देखील यासंदर्भात माहिती देणार आहोत, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांनी आज (२३ जून) पत्रकार परिषद घेत पोटनिवडणुका आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य केलं. ओबीसी आरक्षण प्रश्नी आम्हाला डाटा केंद्राने द्यावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. कारण ५६ हजार ओबीसींच्या जागा बाधित होत आहेत, असं भुजबळ यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीस सरकारने एक अध्यादेश ३१ जुलै २०१९ ला काढला होता. ओबीसींचं आरक्षण उरलेल्या आरक्षणमध्ये देऊ. लोकसंख्येच्या प्रमाणत म्हटल्यावर पण तेव्हा सुद्धा डाटा नव्हता. फडणवीस तुम्ही काय केलं तुम्हाला केंद्र सरकारने डाटा का दिला नाही? पत्रावर पत्र लिहिली. आम्ही केलं नाही असं म्हणता, आता काय करणार आहोत आम्ही? गावोगावी जाऊन जनगणना करणार कशी? तेव्हाच जनगणना करून घ्यायची होती. २ महिन्यात झाल असतं. तेव्हा तुम्ही अध्यादेश काढला, तुम्हाला डाटा दिला नाही, असं भुजबळ यांनी सांगितलं.

सध्या कोरोनामध्ये आम्ही डाटा कसा गोळा करणार? निवडणुकीमध्ये जाहीर सभा कशा होणार? की कोव्हिडचा धोका पत्करायचा? तिसरी लाट येऊ पाहतेय. मी सद्यपरिस्थिती मांडतो आहे. डाटा द्यायला न चा पाडा केंद्र सरकारने वाचला, असा आरोप भुजबळांनी केला. तसंच कोरोनामुळे अधिवेशन दोन दिवसांचं घेत आहोत, अनेक निर्बंध आहेत, मग निवडणुका कशा घेता? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद-पं. समिती पोटनिवडणूक

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमध्ये पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांसाठी खुल्या प्रवर्गातून १९ जुलैला पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. पोटनिवडणुका जाहीर झालेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. २९जून ते ०५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील ४ जुलै रविवार असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जांची छाननी ६ जुलैला होईल. १९ जुलैला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

Aprna

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांशी संवाद साधणार; समाजमाध्यमांद्वारे होणार थेट प्रसारण

Aprna

गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव!

News Desk