HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची काळजी करु नये, अशा छोट्या-मोठ्या गोष्टीत लक्ष न घालण्याचा भूजबळांचा राज्यपालांना सल्ला

नाशिक | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहे. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेत गृहमंत्र्यांना फोन करुन सुचना दिल्या की अर्णब गोस्वामींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास द्यावे. यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (९ नोव्हेंबर) गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना नाशिक येथील पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा छगन भुजबळ यांनी राज्यपालांना काळजी न करण्याचा सल्ला दिला. नियमानुसार अर्णब गोस्वामी यांची सर्व काळजी घेतली जाईल. परंतु, राज्यपाल छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याची मिष्किल टिप्पणी यावेळी भुजबळ यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

14 ऑगस्टला शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

News Desk

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या! – मुख्यमंत्री

Aprna

“हो राज्यपालांच्या सल्ल्यानेच राज ठाकरेंनी मला फोन केला”, शरद पवारांचे स्पष्टीकरण

News Desk