HW News Marathi
महाराष्ट्र

“हो राज्यपालांच्या सल्ल्यानेच राज ठाकरेंनी मला फोन केला”, शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आज (३० ऑक्टोबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. शरद पवार यांनीही ‘राज यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नाही’, असं स्पष्ट केले आहे.

‘राज यांचा मला फोन आला होता. आमच्यात भेटण्याबद्दल काही ठरलं नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. त्यामुळे भेटीचं असं काही नियोजन ठरले नाही. मला फक्त राज ठाकरे यांनी सांगितलं की, मला राज्यपालांनी तुमच्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे’ असं शरद पवारांनी सांगितले आहे.

राज्यपालांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि वीज बिलाच्या मुद्यावर राज ठाकरेंना शरद पवारांशी बोलण्यास सांगितले त्यामुळे अजूनही राज्यपालांची मुख्यमंत्र्यांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन नाराजी कायम आहे का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी शरद पवारांच्या कोर्टात चेंडू का टोलावला? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. आणि येणाऱ्या पुढच्या काळात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष कायम राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भरणेमामा मंत्री झाले कधी जॅकेट घातलं का? मी कधी घालतो का?” अजित पवारांचा ‘हा’ टोला कोणाला ?   

News Desk

हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील साखरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी…!

Aprna

तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक कोरोना बाधित होतील असा अंदाज राजेश टोपेंची माहिती!

News Desk