HW News Marathi
महाराष्ट्र

एसटीचा संप चिघळण्याची शक्यता – कामावर रूजू व्हा नाही तर निलंबन 

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे संपा बाबत दुसऱ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. त्यात कामावर रूजू व्हा नाही तर निलंबनाची कारवाई करू असा इशारा सरकार कडून देण्यात आला आहे. शिवाय कामावर न आल्यास कंत्राटी कामगारांची भरती केली जाईल असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात संप मागे घेण्यास एसटी कर्मचारी तयार नसल्याने हा संप चिघळण्याची दाट शक्य़ता आहे. संप सुरूच असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. संपावर तोडगा निघावा अशी अपेक्षा प्रवाशी करत आहेत.

परिवहन मंत्री दिवकार रावते यांची चर्चेची तयारी

दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पून्हा एकदा एसटी कर्मचारी संघटनां बरोबर चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार आज ही बैठक मुंबई सेंट्रलच्या कार्यालयात बोलवण्यात आली आहे. यात होणाऱ्या चर्चेतून संपाची पूढची दिशा स्पष्ट होणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांचा ‘हा’विश्वासू नेता लवकरचं शिवसेनेत..

Gauri Tilekar

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

swarit

रोगजंतुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी साबणाने वेळोवेळी हात धुण्याची सवय आवश्यक

swarit
महाराष्ट्र

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून

News Desk

मुंबई शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. 18 ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली . जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नाला बंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे. कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे. शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे. देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिका व सीडीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Related posts

मराठवाड्याच्या हितासाठी धनंजय, पंकजा एकत्र ?

News Desk

5 कोटी द्या! नाही तर तुमची बदनामी करेन, धनंजय मुंडेंची महिलेविरोधात तक्रार दाखल

Aprna

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna