HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे, पाटलांचा ठाकरेंना सल्ला

 

मुंबई | राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असं पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रकांत पाटलांचा हा सल्ला स्वीकारणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आगामी निवडणुकीत वंचित- MIM आघाडी होणार? असदुद्दीन ओवेसींचे संकेत

News Desk

आदित्य ठाकरेंना खड्यांचा फटका, आलिशान रेंजरोव्हरचे फुटले टायर

News Desk

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk