HW News Marathi
महाराष्ट्र

सरपंच पदाची आरक्षण सोडत अखेर रद्द, राज्य सरकारचा निर्णय!

पुणे | राज्यात १४ हराज ग्रामपंचायतींसाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान, गेले काही दिवस सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची चर्चा सुरु होती. या चर्चेला पुर्णविराम लागला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडत झाली आहे ती रद्द करुन निवडणुकीनंतर सर्व जिल्ह्यात आरक्षण सोडत कार्यक्रम राबवण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने राज्याती सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, यावरुन विरोधाक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. तर, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रामपंचायतींना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

२०२१ मध्ये १५ जानेवारीला ही निवडणुक होणार आहे. तर १८ जानेवारीला याची मतमोजणी होणार आहे. राज्यातील ८ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. राज्यात सरपंच आरक्षण जाहीर झाल्याने त्या जागेवरती आपली किंवा आपल्या पत्नीची वर्णी लागावी यासाठी जातीचे दाखले आणि आणखी जुळवाजुळवी सुरु असतानाच राज्य सरकारने हा धक्का दिला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतरच ही सोडत जाहीर होणार आहे. दरम्यान, काल (१५ डिसेंबर) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एच. डबल्यू मराठीशी बातचीत करताना असे म्हटले होते की, विरोधकांना हे नीट समजले नाही आहे मी त्यांना समजावून सांगेन असा टोला यावेळी त्यांनी विरोधकांना लगावला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरूणीवर सामुहिक बलात्कार, बलात्कार प्रकरणी तीन तरूणींना अटक

News Desk

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

News Desk

उमेदवार निश्चितीसाठी ‘वंचित’कडून पार्लमेंटरी कमिटीची स्थापना

News Desk