HW News Marathi
महाराष्ट्र

तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना उठा आणि शरद पवारांना काय शपा म्हणायचं? चंद्रकांत पाटील

पुणे | “जयंत पाटील म्हणतात की, चंपा म्हटलं म्हणून काय झालं, तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना उठा म्हणावं काय”, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील यांना जपा, शरद पवारांना काय शपा म्हणायचं आणि पुढचं मी काय म्हणत नाही ते म्हणणं योग्य नाही, पुढे चहा पित असताना म्हणू, ही संस्कृती जोपासायची आहे काय, असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. चंपा आणि टरबुज्या म्हणायचं हे जे कल्चर सुरू आहे ते बदललं पाहिजे, नाही तर आम्हाला पण म्हणता येत, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला. देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीजबिल भरलं म्हणून त्यांनी वीजबिल भरण्याचं समर्थन केले असं म्हणणं हास्यास्पद आहे. वीजबिलात सवलत देणार ही घोषणा नितीन राऊत यांची आहे, त्यांनी ती पूर्ण करावी, असं आवाहनही चंद्रकात पाटलांनी ऊर्जामंत्र्यांना केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा’, काँग्रेसचा शरद पवारांना सल्ला

News Desk

टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच… जयंतरावांचं अचूक नियोजन, भाजपचा टप्प्यात कार्यक्रम !

News Desk

इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा…नितेश राणेंचा वार 

News Desk