HW News Marathi
महाराष्ट्र

“शेवटी विजय सत्याचाच होतो!”, भाजपचा ठाकरे सरकार आणि देशमुखांना टोला

मुंबई | परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावर सीबीआय चौकशी करावी या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार आणि अनिल देशमुखांनी विरोध करत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. शेवटी विजय सत्याचाच होतो. गेली दीड वर्ष हम करे सो कायदा सुरु आहे. मी एक सामान्य माणूस आहे. मी हे कायम म्हणत असतो की, ऊतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. हे कालचक्र फिरत असतं. आम्हीही हे मान्य केलं पाहिजे की ५ वर्ष सत्तेत राहील्यावर २५ वर्ष राहू असं वाटलं होतं पण खाडकन गेलो आम्ही खाली”.

“त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमचं वारंवार आवाहन आहे की, धडाधड देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेले निर्णय रद्द करताय, पण असं सरकार नाही चालवता येत. सरकार मेरीटवर चालवायचं असतं. जुने जे चांगले निर्णय असतात ते तसेच ठेवायचे असतात. तर नवीन निर्णयात विरोधी पक्षाला सामिल करुन घ्यायचे असते. मात्र, विरोधी पक्षाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सहभागी करुन घेतले नाही. कोरोनाच्या बाबतीत सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे चक्र आता फिरुन खाली आले आहे. आणि या सगळ्याचा अंत भीषण होणार आहे”, असा गंभीर इशाराही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरु राहणार

Aprna

२० जानेवारीपर्यंत ५० % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार – उदय सामंत 

News Desk

“…तर ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”,राऊतांचा कंगनाला टोला!

News Desk