HW News Marathi
महाराष्ट्र

अजितदादा जसा राजीनामा खिशात घेऊन फिरत होता तसा तो ६ हजार कोटींचा चेक घेऊन फिरत आहात त्याचं काय करणार?

पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आज (९ जून) पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केला नसल्याची बाब सांगितली. यावेळी अजित पवारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तक्रारच मोदींवर केली आहे. यावरुनच पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

मराठा समाजाची पुन्हा दिशाभूल केली

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन गेले यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मात्र, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा मराठ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यानुसार राज्याला पुन्हा एकदा मराठा समाज मागास ठरवावा लागेल. कारण फडणवीसांनी मेहनतीने जो मराठा समाजाला फायदा करुन दिला होता तो गायकवाड समितीचा अहवाल रद्द झाला आहे. त्यामुळे राज्याला पहिल्यांदा मागास आयोग स्थापन करून समाज मागासलेला दाखवावा लागेल. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राने घटनेत बदल करावा लागेल असं म्हणून काही होणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

जसा तुम्ही राजीनामा घेऊन फिरत होतात तसा…

तसेच, यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधण्यात संधी सोडली नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले की, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस मोफत आहे. मग त्यासाठी ६ हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होतात जसा राजीनामा घेऊन फिरत होतात तसा तो चेक घेऊन फिरत होतात. आता लस तर फ्री आहे. आणि आता मराठा समाजाला ३००० कोटी हवे आहेत. मग त्या ६ हजार कोटींचे करणार काय? कोणाला देणार? दादा ऑन स्पॉट निर्णय करतात, मग करा, असं चॅलेंजही यावेळी अजित पवारांना त्यांनी दिलं आहे.

उद्धवजी एकदा कोरोनाची बंधनं काढून तर बघा…

तसेच, मराठा समजासाठी, ओबीसी समाजासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार. कोरोना आहे म्हणून लोकं शांत आहेत. एकदा कोरोनाची बंधनं काढून तर बघा..मी धमकी देत नाही आहे. कारण भाजपने मोर्चे न काढण्याचा भूमिका घेतली आहे. मात्र, या समाजाच्या न्यायासाठी जर गरज लागली तर भाजपचा बॅच खिशात काढून ठेवणार आणि सहभागी होणार. त्यामुळे उद्धवजी त्या ६ हजार कोटींचं काय करणार ते सांगा, असं चंद्रकांत पाटील यांनी थेट सवाल केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडून आले भाजपच्या जीवावर, सत्तेत गेले विरोधकांबरोबर, राणेंची सेनेवर सडकून टीका

News Desk

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

News Desk

…तर सचिन वाझे होईल फरार, नजरकैदेत ठेवण्यास NIA चा विरोध

News Desk